एच. एस. सी. (HSC) बोर्ड परीक्षेत दयानंद वाणिज्य चे उत्तुंग यश..🌹🌹🌹
लातूर: माहे फेब्रुवारी/मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एच. एस. सी. बोर्ड परीक्षेत दयानंद वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाने यंदाही दैदिप्यमान यश प्राप्त केले आहे. यामध्ये कु.श्रेया सुनील कुंभकरण या विद्यार्थिनीने ९७.५०% गुण घेऊन महाविद्यालयातून सर्वप्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. चि. वेदांत अनिल कलंत्री यांनी ९७.०० % गुण घेऊन द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. तसेच ९६.५० % गुण घेऊन चि. कृष्णकांत संजय कुलकर्णी हा विद्यार्थी सर्व तृतीय आला आहे.
महाविद्यालयातील एकूण ४५ विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा अधिक गुण प्राप्त केले आहेत. तर ८५ % पेक्षा अधिक गुण घेणारे ७७ विद्यार्थी आणि ७५ % पेक्षा अधिक गुण मिळविणारे १७१ विद्यार्थी आहेत. एकूण ७०३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती पैकी ६७१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.महाविद्यालयाचा निकाल ९५.४५% इतका आहे. महाविद्यालयातून विषय निहाय उच्चतम गुण घेणारे विद्यार्थी – पाली विषयात १०० पैकी १०० गुण घेणारे ३० विद्यार्थी, अकाउंटन्सी विषयात १०० पैकी १०० गुण घेणारे १७ विद्यार्थी, बँकिंग विषयात २०० पैकी २०० गुण घेणारे १३ विद्यार्थी, एस.आय.एस.ई. विषयात २०० पैकी २०० गुण घेणारे १० विद्यार्थी, संस्कृत विषयात १०० पैकी १०० गुण घेणारे ०२ विद्यार्थी, अर्थशास्त्र विषयात १०० पैकी १०० गुण घेणारा ०१ विद्यार्थी, सचिवाची कार्यपद्धती या विषयात १०० पैकी १०० गुण घेणारे ०२ विद्यार्थी, गणित विषयात १०० पैकी १०० गुण घेणारा ०१ विद्यार्थी, वाणिज्य संघठन विषयात १०० पैकी ९९ गुण घेणारे ०३ विद्यार्थी, आय.टी विषयात १०० पैकी ९९ गुण घेणारा ०१ विद्यार्थी, इंग्रजी विषयात १०० पैकी ९५ गुण घेणारा ०१ विद्यार्थी, हिंदी विषयात १०० पैकी ९५ गुण घेणारा ०१ विद्यार्थी, मराठी विषयात १०० पैकी ९२ गुण घेणारा ०१ विद्यार्थी.
वरील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन व सत्कार दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री लक्ष्मीरमणजी लाहोटी, कोषाध्यक्ष मा.श्री. संजयजी बोरा, शालेय समिती सदस्य श्री. विशालजी अग्रवाल, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत मान्नीकर, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रशासकीय अधिकारी प्रा. ऋतुजा देशमुख, समन्वयक डॉ. सुभाष मोरे, कार्यालयीन अधिक्षक श्री. फैय्याज पठाण आदींनी केले. यावेळी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.